आज कामावर जायला खूप उशीर झालायं,लवकर आवरलं पाहिजे .अरे,किती काम पडलीत कधी होणार...उद्या submission ची शेवटची तारीख आहे ,लवकरात लवकर पूर्ण करायला हवं..असे आणि याहूनही अधिक विचार रोज आपल्या डोक्यात घोळत असतात .इतकी दमछाक होत असतानाही एक विचार सातत्याने डोक्यात येत असतो rather आपण ठसवत असतो .हे सर्व कोणासाठी चाललयं? माझ्यासाठी ,माझ्या चांगल्यासाठी आणि जरी इतरांसाठी खूप काही करत असलो तरी ते इतर नसतात.ती आपल्या आयुष्याची महत्वपूर्ण नाती असतात .वेळ न पाहता सतत काही ना काही चालू असतं.थोडाफार वेळ मिळाला तरीही तो इतरांसोबत जातो.काहींच्या वाट्याला तेही येत नाही .आयुष्यभर सगळ्यातलं सगळं केलं जातं.परंतु असे काही क्षण जे फक्त स्वतःसोबत घालवायचे होते, स्वतः जगायचे होते ते मात्र निघून गेलेले असतात. असं म्हटलं जातं की आयुष्याचं खरं सार्थक आपण स्वतः बरोबर दुसरयांसाठी घालवलं कि होतं.परंतु या विचाराने काही जण स्वतःला पूर्णपणे विसरून केवळ दुसरयांसाठी जगतात.शेवटपर्यंत स्वतःचा शोध मात्र घेता येत नाही. इथे खरी गरज असते इतरांना काही का...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद