आताच नेटपॅक मारलाय तो पण फक्त १GB, जपून वापरावा लागणार नाहीतर लवकर संपेल आणि नंतर काही उरणार नाही. किती सुंदर व्हिडिओ आहे पहावा का? नको ! नंतर काही उरणार नाही. असं करू सर्व दिवस संपताना पाहू. तोपर्यंत राहुदे हे असच. अरे! दिवसभर बाकीच्या कामांत इतकं व्यस्त व्हायला लागलं की काही पाहताच आल नाही. काही नाही आता गेलं फुकट नेट. उद्या बघेन काहीतरी आणि असं करता करता एक दिवस नेट पॅक संपला.. आयुष्याचं पण असच असतं ना. किती छोट आयुष्य आहे. आताच सर्व जगलं तर पुढे काही मिळणार नाही या एका गोष्टीवरून आपण तो प्रत्येक सुखाचा क्षण अश्या पद्धतीने नाकारतो, टाळण्याचा प्रयत्न करतो की जीवनाच्या अशाच एका संध्याकाळी आपल्या लक्षात येत की अरे ज्या अंतिम सुखाची आपण वाट पाहत होतो ते तर प्रत्येक क्षणी आपल्या पुढे हात पसरून होत. का नाही आपण त्याचा स्वीकार केला? का आपण त्याला वेळोवेळी नाकारलं? याच कारण आपल्याला वाटल की आता हा क्षण जगला तर कदाचित पुढे आपल्यासाठी काहीच उरणार नाही. पुढे कधीतरी आपल्याला मोठा आनंद, खूप सुख मिळेल या अपेक्षेने आपण तो प्रत्येक क्षण गमवला जो आपल्याला त्या...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद