Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

असा हा प्रवाह

निशाला आज खूप अस्वस्थ वाटत होत. कारण अस होत की ती एका कंपनी मध्ये खूप वर्ष काम करत होती. पण काही कारणामुळे तिला ती कंपनी सोडावी लागली.   या कंपनी मध्ये तिच्या खूप साऱ्या आठवणी होत्या. खूप काही शिकायला मिळालं होत. चांगले संबंध तयार झाले होते. पण आता तिला परत तिथे जाता येणार नव्हत. म्हणून ती अस्वस्थ झाली होती. काहीतरी निसटल्यासारखं, चुकल्यासारखं तिला वाटत होत.  पुढे काय करायचं हा ही एक प्रश्न होताच. इतक्या वर्षांची सवय, रूटीन सर्वच आता बदलणार. परत नव्याने सर्व घडी बसवायची. या सर्वच गोष्टींचा नाही म्हटलं तरी तिला ताण आलाच होता. या सर्व गोष्टींचा मेळ बसवून परत आयुष्य सुरू करायचं. आपण कुठेतरी अडकु की काय, थांबून जाऊ की काय अशी भीती पण तिला वाटत होती.  एक दिवस निशाची मैत्रीण मिता तिला भेटायला आली. तेव्हा निशाची ही अस्वस्थता तिला जाणवली. तिने त्याचे कारण तिला विचारले. तेव्हा निशाने सांगितले. "मिता, ती पहिली कंपनी होती जिथे मी कामाला सुरुवात केली होती. मला तिथे बरच काही शिकायला मिळालं होत. तिथे माझ्या अनेक आठवणी जोडल्या आहेत. मी जरी कंपनी सोडली असली तरी माझा मन तिथे अडकून आह...

जावे त्यांच्या देशा

 रोजच्या प्रमाणे मी आणि माझा मित्र कामावर चाललो होतो. आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये काम करायचो. त्यामुळे जाणं येणं पण एकत्रच व्हायचं. रस्त्यावरून जाताना वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणे, आजूबाजूच्या गोष्टींना पाहत कामावर जाताना रस्ता कधी संपायचा हे समजायचं नाही. रस्त्यावर जाताना एक जोडप नेहमी दिसायचं. अगरबत्ती, कापूर अस काही ना काही ते विकत बसायचे. दुर्दैवाने त्यांना डोळे नव्हते. पण त्यांच्या जिद्दीची आणि कष्टाची कमाल वाटायची.  एक दिवस जाताना मी त्यांना पाहिलं व तिथे कापूर घेण्यासाठी थांबलो. मला हवा होता तितका कापूर मी विकत घेतला. त्याचे २०रुपये होत होते. तितके मी त्यांना दिले व धन्यवाद म्हणून तिथून निघालो. नेहमीसारख मित्र सोबत होताच. तो मला म्हणाला, अरे त्या बिचाऱ्या दोघांना दिसत नाही. तु काही पैसे अजून दिले असते तरी चालल असत. त्यांना पण मदत झाली असती.  यावर मी म्हणालो, मित्रा जास्त पैसे द्यायला मला काहीही अडचण नव्हती. पण तू एक गोष्ट पहिली का? ते पाहू शकत नाहीत हे त्या दोघांना माहीत आहे. तरीही ते या वस्तू विकत आहेत. कारण त्यांना कोणाची फुकट मदत नकोय. त्यांना स्वतःच्या कष्टाने...

चालढकलपणा आणि नियोजन

    चिराग खूप निराश, हताश  झाला होता. त्याला समजत नव्हत त्याच कुठे आणि काय चुकत आहे. झालं असं की चिराग दरवेळी ठरवायचा किंबहुना वचन द्यायचा की आपण परीक्षेचं नीट रुटीन बसवायचं, चांगला अभ्यास करायचा. पण दर वेळी त्याच सर्व टायमिंग उलट सुलट व्हायचं आणि तो अभ्यास पुढे ढकलून त्यावेळी काहीतरी वेगळंच करत बसायचा. परिणामी आयत्या वेळी जसा होईल, जेवढा होईल तेवढा अभ्यास करून तो परीक्षा द्यायचा. याचा अर्थात त्याच्या मार्क्स वर पण परिणाम होत होता. बरं अस एका परीक्षेच्या वेळी नाही तर प्रत्येक परीक्षेच्या वेळी व्हायचं. त्याला प्रश्न पडायचा आपल्याला अभ्यासाचं महत्त्व आहे, इच्छा आहे तरी अस का होत?     कॉलेज मध्ये शिकत असताना आपल्या अनेकांच्या बाबतीत हे झालेलं असत. आपल्या सर्वांनाच नीट अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे असतात. पण ते होत नाही.  काही ना कारणाने आपण अभ्यास पुढे ढकलतो आणि एकसारखं अस झाल्याने नंतर आपल्याला निराशा यायला लागते. पण चिराग सारखं अनेकदा कारणच समजत नाही.      काय बर असेल याच कारण? तर ते आहे जी गोष्ट करायची ठेवलेली असते त्याच चांगलं detailed...