Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

स्थितीस्थापकत्व

विजय आणि प्रकाश हे दोन शेजारी शेजारी. दोघंही नदीकाठी राहत होते. एके वर्षी खूप जोराचा पाऊस पडून पुर आला व त्यात दोघांच्याही घरामध्ये पाणी आलं. त्यांचा बरच नुकसान देखील झालं. पूर खूपच भयानक होता त्यामुळे नुसत पाणी घरात येऊन थांबल नाही तर घराचा काही हिस्सा पण खराब झाला, उन्मळून पडला. जे काही कष्टाने मिळवलं होत सर्व पाण्यातून वाहून गेलं. दोघांनाही या गोष्टीचा धक्का बसला. पण काही काळाने प्रकाशने पुन्हा कष्ट करून सर्व काही उभारल व नव्याने सर्व निर्माण करून तो  मूळपदावर आला. विजयला मात्र ते जमले नाही. तो आधीच्याच दुःखात अडकून राहिला. दोघंही एकाच त्रासात असूनही फक्त प्रकाश त्यातून कसा बाहेर पडू शकला ...?  तर त्याचं कारण आहे त्यामध्ये असणारी स्थितिस्थापकत्वाची क्षमता. स्थितिस्थापकत्व म्हणजे आलेल्या संकटांना, समस्यांना सामोरे जाऊन त्यातून धडा घेऊन परत नव्या उमेदीने जगणे, त्या समस्येमध्ये अडकून न राहता त्यातून बाहेर पडून पुन्हा मुळ पदावर येणे. रबर जसा कितीही ताणला तरी परत स्वतःचा आहे तो आकार घेतो तसच ह्या व्यक्ती आलेल्या संकटाना खंबिरपणे सामोरे जाऊन पुन्हा नवीन सुरुवात करतात. ज्याला boun...

अशा प्रसंगी काय करावे?

आपण   माणसं आहोत. आता माणूस आहे म्हटल्यावर मन आलं. मनात काय असत तर वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या भावना आणि या विचार, भावनांच्या आधारे आपण वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जात असतो. तो प्रसंग हाताळत असतो. पण दर वेळी हे विचार किंवा या भावना त्या त्या परिस्थितीत योग्य असतीलच अस नाही. असल्या तरी योग्य प्रमाणात असतील अस नाही.  उदा. अचानक परीक्षा आहे अस सांगितल्या नंतर भीती वाटणं किंवा चिंता वाटणं त्या प्रसंगात योग्य आहे. वाघाची चाहूल लागल्यावर ससा पळून जातो कारण त्याला त्याचा जीव वाचवायचा आहे. त्याने अस नाही केलं तर त्याचा जीव धोक्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अडचणीच्या प्रसंगात तशा प्रकारच्या भावना व्यक्त करण ही माणसाची प्रवृत्ती आहे.  पण अडचणीच्या प्रसंगात नेमक्या कोणत्या भावना व्यक्त करायच्या म्हणजेच सकारात्मक की नकारात्मक, चांगल्या की वाईट यामध्ये बऱ्याचदा लोकांचा गोंधळ उडतो.  बऱ्याच लोकांना अस वाटत की काहीही झालं, कितीही चांगले वाईट प्रसंग आले तरी आपण सकारात्मक राहील पाहिजे. तश्याच भावना असल्या पाहिजेत. पण सकारात्मक भावना ठेवण म्हणजे चांगल होण नाही. समजा पुरात घर बुडण्याची शक...