Skip to main content

Posts

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...
Recent posts

स्वतःला दोष देताय???

नाही रे, मी खरंच वाईट माणूस आहे. काय उपयोग आहे माझा मुलगा म्हणून? काही करू शकत नाही मी माझ्या घरातल्यांसाठी? ना त्यांना काही देता येत, ना कुठे बाहेर घेऊन जाऊ शकतो. काय उपयोग आहे माझा सांग? एक मुलगा म्हणून, नवरा आणि बाबा म्हणून पण मी अपयशी आहे असं वाटतं मला. गिरीश अगदी हताश होऊन रवीला, त्याच्या मित्राला हे सर्व सांगत होता. पण रविलाच माहीत होतं की हे खर नाही. याचं कारण गिरीश जरी स्वतःला आता दोष देत असला, नावं ठेवत असला तरी त्याचे जे काही कष्ट आहेत, आपल्या कुटुंबासाठी तो ज्या पद्धतीने झटत होता ते सर्व रवी पाहत आला होता. कोणाचा आधार नसताना, मदत नसताना त्याने स्वतःच्या बळावर सर्व मिळवलं होतं, तयार केलं होतं. आता एकंदरीत परिस्थितीच अशी होती की काहीवेळा त्याला मुलांच्या गरजा, हौशी इच्छा असूनपण पूर्ण करता येत नसत. आता देखील त्याच्या मुलीला चिन्मयीला सहलीसाठी जायचं होतं. पण फी जास्त असल्याने त्याला तिला पाठवता आलं नाही. त्यामुळे ती हिरमुसून बसली होती. कामातून वेळ काढून घरातल्यांना त्याला फारसा वेळ देता येत नसे, आणि फार कुठे घेऊन जाता येत नसे. या सर्व गोष्टींचं त्याला दुःख होई. पण आज त्याचं हे द...

पूर्ण गोष्टींपेक्षा अपूर्ण गोष्टी का बरं लक्षात राहतात...??

आपल्याला हा प्रश्न कधी पडलाय का? की दिवसभरात किंवा एकंदरीतच रोजच्या आयुष्यात वावरताना आपण ज्या काही गोष्टी करत असतो, पाहत असतो, अनुभवत असतो त्यातल्या पूर्ण झालेल्या गोष्टींपेक्षा अपूर्ण गोष्टी आपल्याला चांगल्या लक्षात राहतात. मग ते एखाद्या माणसाशी झालेलं अर्धवट बोलणं असेल, अर्ध्यावर वाचून ठेवलेलं पुस्तक असेल, अर्धवट केलेला प्रोजेक्ट किंवा मग इंटरवल पर्यंत पाहिलेली मूव्ही. पूर्ण केलेलं काम जितकं आपलं डोक्यात राहत नाही तितक्या या गोष्टी लक्षात राहतात, ज्यातून आपण त्या पूर्ण करायच्या मागे लागतो, त्यासाठी प्रेरित असतो. नाहीतर आपल्याला एकसारखी अस्वस्थता किंवा अर्धवटपणा जाणवतो. मानसशास्त्रामध्ये याला " zeigarnik effect " असं म्हटलं जातं.  काय आहे zeigarnik effect ?? हा effect सर्वात पहिल्यांदा रशियन मानसशास्त्रज्ञ bluma zeigarnik हिने मांडला. एकदा रेस्टॉरंटमध्ये ती आणि kurt Levin बसले असता एका वेटरने त्यांचे लक्ष वेधून घेतले. त्या वेटरला ज्या unpaid orders होत्या म्हणजेच ज्यांचं बील भरलेलं नव्हतं त्या चांगल्या लक्षात नव्हतं पण ज्यांचं बील पूर्ण झालेलं त्यांच्या details आठवायला मा...

आरंभ आहे पण अंत नाही...

अरे तू ते काम करायला घेतलं होतस ना मधे, काय झालं त्याचं आता करत नाहीस का? तू नवीन दुकान चालू केलेलस ना, आता चालवत नाहीस का?  नाही मी केली होती सुरुवात, मला आवडलेले पण ते काम, पण नंतर नंतर नको वाटायला लागलं. काय माहित सुरुवातीला जी मजा येत होती, जो उत्साह होता कामाचा, तो आता नाही वाटत. कामात कशी मजा, एकप्रकारचा उत्साह पाहिजे. त्याशिवाय काय नाही होत. ते नसेल तर काय उपयोग? सुरुवातीला जोमाने काहीतरी सुरू करून ते अर्ध्यातुन बंद करणं, पुढेच ढकलत राहणं आणि त्यामागची कारण अशी देणं. आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत असं होतं. काहीतरी मोठं ठरवणे, करायला घेणे आणि ते असं पुढे जाणे, बंद पडणे. याला 'Behavioural procrastination' असं म्हणतात. ज्याला आरंभशूरता असे म्हणतात. हा असा चालढकलपणा आहे ज्यात व्यक्तीला वाटत की motivation असलं, प्रेरणा असली तरच ते काम पूर्ण करू शकतो, शेवटपर्यंत नेऊ शकतो. त्याशिवाय काही साध्य करता येत नाही, मिळवता येत नाही. कामात प्रेरणा पाहिजेच.  खरंच असं असतं का? तर नाही. कोणतंही काम करण्यासाठी प्रेरणा लागते का? तर नक्की लागते. Motivation अशी ऊर्जा आहे, असा driving force आहे ज...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

फोबिया

ए मी नाही येणार हा तिथे, मला अंधाराची भीती वाटते. सूर्यास्त पाहायचा तो पण इतक्या उंचावरुन, तूच जा बाबा. उंच ठिकाणी मला घाबरायला होतं. त्यांचा कुत्रा कसला भयानक आहे, अंगावरच येतो. मला जाम भीती वाटते कुत्र्यांची. सर्वसाधारणपणे, आपल्यापैकी प्रत्येकाला कसली ना कसली भीती ही असतेच. कारण ही भावना अगदी आदिमकाळापासून चालत आलेली आहे आणि आपल्या अस्तित्व टिकवण्याशी संबंधित आहे. एखाद्या गोष्टीने जेव्हा आपल्या जिवाला धोका आहे असे आपल्याला वाटते तेव्हा आपल्या मनात भीतीची भावना निर्माण होते ज्यातून आपण आपला बचाव करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करतो. आदिमकाळात हिंस्र पशू, नैसर्गिक धोके यासारख्या गोष्टी, धोके सतत माणूस अनुभवायचा आणि तिथे ही भीतीची भावना त्याला मदत करायची कारण ती रास्त होती. काळ सरकत गेला, सुरक्षिततेची साधने तयार झाली पण माणसाच्या मनातील भीती काही गेली नाही. आता जसं म्हटलं की भीती ही आपल्या अस्तित्व टिकविण्याच्या संबधित भावना असल्याने तो आपल्यामध्ये असली पाहिजे, पण प्रमाणात. जिथे भीती असली पाहिजे तिथे असली पाहिजे. कारण ती नसली तर आपण स्वतःचा जीव धोक्यात टाकू आणि त्यामुळेच लहानपणीपासून आपल्या ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...