रिया खूपच दुखावली होती. रडत रडत तोंडाचा पट्टा तर एकसारखा चालूच होता. ' तो मला समजूनच घेत नाही, इतकी वर्ष आम्ही रिलेशन मध्ये आहोत, मी मात्र त्याच लगेच ऐकायचं, त्याला मात्र तस करता येत नाही. मी दर वेळी सांगते; अस वागू नको, असा राहू नको. पण नाही स्वतःला हवं तसच करायचं. मी काही अपेक्षा ठेवूच नये का त्याच्याकडून"? हा प्रश्न अर्थात मलाच विचारला गेला होता. विचार केला जरा वेगळ्या पद्धतीने त्यावर उत्तर देऊ. पण त्याआधी रियाला शांत करण गरजेचं होत. तिला शांत केलं, पाणी दिलं आणि ती जरा शांत झाल्यावर एक प्रश्न विचारला. "रिया जर तुझी मनस्थिती आता जरा ठीक झाली असेल तर मी तुला एक गोष्ट सांगू का? तू ऐकशील का"? ती म्हणाली, हो ऐकेन. चालेल ऐक तर मग! मी गोष्ट सांगायला सुरुवात केली. "एका गावात जत्रा चालू असते, पाळणे, खेळण्यांची दुकान सर्व काही छान मांडलेल असत. सर्व लहान मूल , मोठी माणसं फिरत, आनंद घेत असतात. ह्यात होत काय, एक मुलगा एका फुगेवल्याकडे बघतो. त्याच्याकडे एकच फुगा उरलेला असतो. त्याला तो खूप आवडतो आणि तो मनोमन देवाकडे प्रार्थना करतो की देव मला तो फुगा मिळुदे. इथे खर गंमत हो...
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद