Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

जरा विसावू या वळणावर

भले बुरे जे घडून गेले  विसरून जाऊ सारे क्षणभर जरा विसावू या वळणावर सुधीर मोघे यांच्या कवितेतल्या या ओळी आपल्याला खूप काही सांगून जातात. प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य हे शांत, विना कटकटीच आणि आनंददायी असावं अस वाटत असत. कोणालाही आपल्या आयुष्यात दुःख नको असतात, ओढाताण नको असते. आपल्या मनासारख्या गोष्टी व्हाव्यात यासाठी माणूस आयुष्यभर खटपट करत राहतो, न थांबता झटत राहतो. पण सर्व आपल्या मनासारखं होणार असेल तर ते आयुष्य कसलं? आपल्याला नको असलेल्या गोष्टी, अनपेक्षित घटना या होत राहतात. पण त्यात गुंतून पडून पुढचा मार्ग अजून अडचणीचा करण, होऊन गेलेल्या गोष्टी न स्वीकारता त्यापासून लांब पळण योग्य नाही.  जसं की मनाली, मनाली आणि सुयश हे जवळपास चार वर्ष एका नात्यात होते. काही कारणामुळे हे नात पुढे जाऊ शकले नाही. याचा परिणाम मनालीने स्वतःला त्रास करून घ्यायला सुरुवात केली. सुरवातीचा काही काळ तिला ही गोष्टच मान्य होत नव्हती की नात तुटल आहे. ती स्वतःला सत्य स्वीकारू देत नव्हती, त्यापासून पळून जात होती. एखादी जखम भरून काढण्यासाठी जो एक ठराविक वेळ त्याला द्यायला पाहिजे तो तिला काही केल्या ...

फक्त अंगठा तुटला होता....

नेहमीप्रमाणे मी आणि माझ्या सासूबाई आज देवीच्या दर्शनासाठी मंदिरात जायला निघालो होतो. मंदिरात जाताना आम्ही रिक्षा केली. दोघी छान गप्पा मारत, इकडच्या तिकडच्या गोष्टी करत निघालो. मंदिर आल, आम्ही आवारातून पूजेचं सामान घेतल  व आत गेलो. देवीच दर्शन घेतलं आणि थोडावेळ बसून घरी परत यायला निघालो. पण मंदिरातून येताना व्ह्यायच ते झालं. मंदिर जास्त प्रसिद्ध असत ते तिथल्या देवासाठी आणि दुसर म्हणजे काढून ठेवलेल्या चपलांसाठी. कश्या चपला चोरीला जातात, मग काहीवेळा काही अतरंगी लोक कसं दुसऱ्याच चप्पल घालून जातात. एक ना अनेक. आज पण तसच झालं. पण जरा वेगळा प्रकार. म्हणजे गोष्ट चपलाचीच होती पण माझ चप्पल काही चोरीला गेला नाही. झालं असं, आम्ही यायला निघालो; दुपारची वेळ त्यामुळे रिक्षा फार नसतात म्हणून आम्ही चालत यायचं ठरवलं. मंदिराच्या बाहेर दोन पावलं टाकते इतक्यात माझ्या चपलाचा अंगठा तुटला.  सासूबाईंनी ते पाहिलं आणि त्यांच्या बोलण्याची गाडी सुरू झाली. "अरे देवा! चप्पल तुटलं तुझ, आता कशी चालणार आहेस तू. त्यात इथे एक रिक्षा नाही. आताच हे सर्व व्हायचं होत. कठीण होऊन बसलं सर्व. आता काय करायचं आपण? या तुटक...