आयुष्याचं पण असच असतं ना. किती छोट आयुष्य आहे. आताच सर्व जगलं तर पुढे काही मिळणार नाही या एका गोष्टीवरून आपण तो प्रत्येक सुखाचा क्षण अश्या पद्धतीने नाकारतो, टाळण्याचा प्रयत्न करतो की जीवनाच्या अशाच एका संध्याकाळी आपल्या लक्षात येत की अरे ज्या अंतिम सुखाची आपण वाट पाहत होतो ते तर प्रत्येक क्षणी आपल्या पुढे हात पसरून होत. का नाही आपण त्याचा स्वीकार केला? का आपण त्याला वेळोवेळी नाकारलं? याच कारण आपल्याला वाटल की आता हा क्षण जगला तर कदाचित पुढे आपल्यासाठी काहीच उरणार नाही. पुढे कधीतरी आपल्याला मोठा आनंद, खूप सुख मिळेल या अपेक्षेने आपण तो प्रत्येक क्षण गमवला जो आपल्याला त्या वेळी आनंद देणारा होता. पण मग आता का नाही मी तो आनंद घेऊ शकत? आता का मी ते सुख उपभोगू शकत? याचं कारण माझ्याकडे तो जगायला आता वेळच नाही. म्हणूनच आयुष्य जेव्हा मुक्तहस्ताने सुखाची उधळण करत असत तेव्हा त्याचा स्वीकार करा नाहीतर एके संध्याकाळी सुख असेल पण ते जगायला जी वेळ पाहिजे ती मात्र निघून गेलेली असेल....
नमस्कार मित्रांनो, समतोल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. इथे तुम्हाला मानसशास्त्राचा वापर करून आपल्या रोजच्या जीवनाला अजून चांगल कसं जगता येईल, त्याचा आनंद कसा घेता येईल याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. तुम्हाला लेख आवडल्यास जरूर कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद

Wow kiti chan vichar
ReplyDeleteThank u
ReplyDeleteTo good kavya .keep it up 👍👍👍👍
ReplyDeleteMast ahey
ReplyDeleteThanks for reply
ReplyDeleteKhup chan kavya
ReplyDeleteKhup chan 🥰
ReplyDeleteThank u
ReplyDelete