Skip to main content

जरा विसावू या वळणावर

भले बुरे जे घडून गेले 

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर

सुधीर मोघे यांच्या कवितेतल्या या ओळी आपल्याला खूप काही सांगून जातात.

प्रत्येक व्यक्तीला आपलं आयुष्य हे शांत, विना कटकटीच आणि आनंददायी असावं अस वाटत असत. कोणालाही आपल्या आयुष्यात दुःख नको असतात, ओढाताण नको असते. आपल्या मनासारख्या गोष्टी व्हाव्यात यासाठी माणूस आयुष्यभर खटपट करत राहतो, न थांबता झटत राहतो. पण सर्व आपल्या मनासारखं होणार असेल तर ते आयुष्य कसलं? आपल्याला नको असलेल्या गोष्टी, अनपेक्षित घटना या होत राहतात. पण त्यात गुंतून पडून पुढचा मार्ग अजून अडचणीचा करण, होऊन गेलेल्या गोष्टी न स्वीकारता त्यापासून लांब पळण योग्य नाही. 

जसं की मनाली, मनाली आणि सुयश हे जवळपास चार वर्ष एका नात्यात होते. काही कारणामुळे हे नात पुढे जाऊ शकले नाही. याचा परिणाम मनालीने स्वतःला त्रास करून घ्यायला सुरुवात केली. सुरवातीचा काही काळ तिला ही गोष्टच मान्य होत नव्हती की नात तुटल आहे. ती स्वतःला सत्य स्वीकारू देत नव्हती, त्यापासून पळून जात होती. एखादी जखम भरून काढण्यासाठी जो एक ठराविक वेळ त्याला द्यायला पाहिजे तो तिला काही केल्या देता येत नव्हता. त्यातून साहजिक मानसिक आणि त्याचा परिणाम म्हणून शारीरिक त्रास व्हायला लागला. इथे खरतर थोडावेळ थांबल पाहिजे. थोडंसं विसावल पाहिजे. परिस्थितीला, स्वतः ला या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. 



आपलं आयुष्य हे अनेक गोष्टींनी भरलेलं असत. फक्त एका गोष्टीमध्ये स्वतः ला पूर्णपणे गुंतवून न ठेवता, त्यात न फरफटता बाकीच्या गोष्टीमध्ये मन रमवल पाहिजे. त्या क्षणपुरता का होईना दुःखाला विसरता आला पाहिजे. 

कोणतीही मॅच असो, एखादा प्रवास असो किंवा अगदी सोप उदाहरण घ्यायचं झालं तर आपण नेहमी करतो ते जेवण असो प्रत्येक गोष्टीत कुठेतरी थांबावं लागतं, थोडा वेळ द्यावा लागतो, घ्यावा लागतो तर पुढील काम नीट होतात. समुद्रात आलेली लाट कितीही मोठी असुदे, सरतेशेवटी ती खाली येते पण तिची वेळ झाल्यावर. तिथे आपण अस म्हणून चालत नाही की ती लाट लगेच खाली आली पाहिजे. तिथे आपण वाट पाहावी लागते. समुद्रात वादळे ही येतच असतात. ती वादळे का आली? त्यांनी येऊच नये असं म्हणून नावाड्याने त्याची होडी त्यात नेली तर त्याचा जीव जाऊ शकतो. म्हणून इथे थोड थांबलं पाहिजे, थोडा विसावा घेतला पाहिजे. गोष्टी त्यांच्या वेळेप्रमाणे पूर्ववत होतात. पण त्यासाठी आपण जरा विसावल पाहिजे.


- काव्या धनंजय गगनग्रास

एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र


 

Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...