Skip to main content

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर. 



आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आहे की फोनचा अतिवापर करणाऱ्या ८०% लोकांमध्ये हा आजार दिसून येतो.

यात आपण आपलाच वेळ वाया घालवतो, सतत आपल्याला काहीतरी सुटून जाईल किंवा फोन येईल याची चिंता लागून राहते. मन यातच राहत आणि आपण फोन घेऊन बसतो.

जर हे कमी करायचं असेल तर काही गोष्टी करणं आवश्यक आहे.

१. फोनचा वापर कमी करा : आताच्या काळात फोन पूर्णपणे टाळणे तर शक्य नाही. पण, त्याचा वापर कमी करणं शक्य आहे. जिथे खरंच फोनची गरज नाही तिथे फोन बाजूला ठेवणे, दुसऱ्या कोणत्या तरी कामात राहणे हे आपण करू शकतो.

२. नोटिफिकेशन्स अडजस्ट करणे : फोनमध्ये कितीतरी ॲप्स असतात ज्यांचे सारखे नोटोफिकेशन येत राहतात, आणि आपलं लक्ष जात राहतं. जी ॲप्स कमी महत्त्वाची आहेत, त्यांचे नोटोफिकेशन काही काळाकरता बंद करणे ज्यामुळे आपले सतत लक्ष जाणार नाही.

३. रिंगटोन बदलणे: आपल्या फोनला ठराविक रिंगटोन असली आणि ती दुसरीकडे वाजली तरी आपला फोन वाजल्यासारखा आपल्याला वाटतं. त्यामुळे रिंगटोन काही वेळा बदलणे, ठराविक ठिकाणी फोन सायलेंट करणे हे ही उपाय यावर प्रभावी ठरतात.

४. फोन सोडून बाकी गोष्टींमध्ये मन रमवणे: फोनशिवाय देखील अश्या अनेक गोष्टी असतात, ज्या आपण छंद म्हणून जोपासल्या तर आपलं हे व्यसन कमी होऊ शकतं. बागेत फिरायला जाणे, लोकांसोबत गप्पा मारणे, काही ना काही कला शिकणे याने फोन आपोआप दूर होऊ शकतो.

५. थेरपिस्टची मदत: वरील कोणतेही उपाय कामी येत नसतील तर अश्या वेळी चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणे आवश्यक आहे. जेणेकरून यातून होणाऱ्या नुकसानापासून आपण वाचू शकतो.


Comments

Popular posts from this blog

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...