Skip to main content

Control and Influence


सुमन खूप वैतागली होती. तिची चिडचिड होत होती. त्याच कारणही तसच होत म्हणा. तिचा ८ वर्षाचा मुलगा अनय, तिने सांगितलेली कोणतीही गोष्टी कधी नीट ऐकत नसे. त्याला ओरडून, रागावून, प्रेमाने समजावून झाल पण परत पहिले पाढे पंचावन्न. एक दिवस ती सहज तिच्या मैत्रिणी च्या, वर्षाच्या घरी गेली. दारावर असताना सुमनच्या कानावर वर्षाचं आणि तिच्या मुलाचं बोलण आलं. "अरे वा! राज, very good! पसारा होऊ नये म्हणून तू ही सर्व खेळणी नीट एकत्र करून ठेवलीस हे खूप चांगलं केलं. आता अजून एक छोटं काम करशील का ? जशी तू ही सर्व खेळणी एकत्र करून ठेवली तशीच ती आत तुझ्या रूममध्ये ठेवशील? म्हणजे ती हरवणार नाहीत आणि पुढच्या वेळी तुला लगेच मिळतील"- वर्षा.  " हो आई, लगेच ठेवतो" - राज.

बाहेरून सुमन हे सर्व ऐकत होती. ती आत आली व वर्षाला म्हणाली, "वर्षा अग तुझा मुलगा किती गुणी आहे. तू सांगितलेलं लगेच ऐकतो. नाहीतर माझा अनय, माझी एक गोष्ट ऐकत नाही". वर्षाला सुमनचा हा प्रॉब्लेम माहीत होता.  तिने सुमन ला तिथेच बसायला सांगितले व ती आत गेली. थोड्या वेळाने ती पाणी घेऊन आली व सुमनला म्हणाली, सुमन तुझा हात पुढे कर आणि हे पाणी घेऊन मुठ बंद कर. बरं त्यातून पाणी जराही पडू देऊ नकोस. सुमन ला तिचे बोलणे विचित्र वाटले. तरी तिने तसे केले. मग वर्षाने विचारले, सांग बर, काय झालं? "अग काय होणार, पाणी कधी मुठीत घट्ट धरल्यावर राहील का ? पडणारच ना ते!" सुमन.

अगदी बरोबर! आपली मुलं पण पाण्यासारखी असतात. त्यांना तू जितकं घट्ट धरू पाहशील तितकीच ती हातातून निसटणार. म्हणून अशावेळी, आपण जसं हळुवार ओंजळीत पाणी घेतो त्याच प्रमाणे मुलांना कंट्रोल न करता त्यांच्या कलाने घेऊन बऱ्याच गोष्टी सांगाव्या लागतात. "म्हणजे, ते कसं करायचं"? सुमन. 

    म्हणजे तू जस अनयला प्रत्येक गोष्टीमध्ये तू असच कर ,तसच कर. खेळायला बाहेर जाऊच नको, इतका वेळ फक्त अभ्यासच करायचा अस कंट्रोल करायला पाहतेस त्याने काही फायदा होतो का ? तर नाही . उलट तो अधिकच वेगळं वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून अश्या वेळी कंट्रोल न करता, त्याला तीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने सांगून करायला लावायची. ती कशी तर त्या गोष्टीचे फायदे, तोटे तू सांगू शकतेस, तसच त्याने एखाद चांगलं काम केलं तर तू त्याच कौतुक करू शकतेस, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या पद्धती वापरून तू त्याला गोष्टी सांगू शकतेस. यातून तुझा त्याच्यावर चांगला प्रभाव पडेल आणि तो तुझी सांगितलेली काम करण्याची शक्यताही वाढेल.

     हे सर्व ऐकुन सुमनला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला.  ती घरी निघाली होती परंतु अनयला कंट्रोल करण्याच्या विचारात नसून त्याला प्रभावित करण्याच्या..

Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...