Skip to main content

चालढकलपणा आणि नियोजन

   चिराग खूप निराश, हताश  झाला होता. त्याला समजत नव्हत त्याच कुठे आणि काय चुकत आहे. झालं असं की चिराग दरवेळी ठरवायचा किंबहुना वचन द्यायचा की आपण परीक्षेचं नीट रुटीन बसवायचं, चांगला अभ्यास करायचा. पण दर वेळी त्याच सर्व टायमिंग उलट सुलट व्हायचं आणि तो अभ्यास पुढे ढकलून त्यावेळी काहीतरी वेगळंच करत बसायचा. परिणामी आयत्या वेळी जसा होईल, जेवढा होईल तेवढा अभ्यास करून तो परीक्षा द्यायचा. याचा अर्थात त्याच्या मार्क्स वर पण परिणाम होत होता. बरं अस एका परीक्षेच्या वेळी नाही तर प्रत्येक परीक्षेच्या वेळी व्हायचं. त्याला प्रश्न पडायचा आपल्याला अभ्यासाचं महत्त्व आहे, इच्छा आहे तरी अस का होत?

    कॉलेज मध्ये शिकत असताना आपल्या अनेकांच्या बाबतीत हे झालेलं असत. आपल्या सर्वांनाच नीट अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे असतात. पण ते होत नाही.  काही ना कारणाने आपण अभ्यास पुढे ढकलतो आणि एकसारखं अस झाल्याने नंतर आपल्याला निराशा यायला लागते. पण चिराग सारखं अनेकदा कारणच समजत नाही.

     काय बर असेल याच कारण? तर ते आहे जी गोष्ट करायची ठेवलेली असते त्याच चांगलं detailed planning नसणे. यामुळेच आपण कळत नकळत त्या गोष्टीचा चालढकलपणा करू लागतो. चालढकलपणाच्या या प्रकाराला promisary note procrastination असे म्हणतात.

 ज्यामधे व्यक्ती एखादी गोष्ट कऱ्याच ठरवते.जी  गोष्ट करणार त्याचे महत्त्व असते  परंतु  प्लॅनिंग नसल्याने चालधकलपणा होतो. इथे खरतर आपण जी गोष्ट करायची ठरवतो त्याच नीट  प्लॅनिंग करण आवश्यक असत. जस की चिराग ला जर अभ्यासाचं रूटीन बसवायचं असेल तर दिवसातील किती तास, कोणत्या वेळी, तो अभ्यास करणार. त्यानुसार बाकीच्या कामाच्या वेळा ठरवणे जस की जेवण, घरातील माणसांसोबत वेळ घालवणे बाकीची काम इत्यादी. परीक्षेच्या वेळी कोणत्या विषयाचा अभ्यास आधी करायचा त्याला किती वेळ द्यायचा हे सर्व बारीक  प्लॅनिंग आधी करावं लागणार. 

ज्या वेळी एखाद्या गोष्टीचं पूर्वनियोजन केलं जातं तेव्हा आयत्या वेळी करताना येतो तसा ताण आपल्याला येत नाही आणि आपण आधीच सर्व ठरवलेलं असल्याने त्या वेळेत शक्यतो आपण दुसर काही काम करत नाही. साहजिक चालढकल पणा कमी होतो आणि आपल्याला निराशा ही  येत नाही.

- काव्या धनंजय गगनग्रास. (एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...