Skip to main content

चला चांगल बोलूया

आज चार महिने होत आले मी senior citizen group  सुरू करून. सुरू केल्यापासून याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात आम्ही वेगवेगळे व्यायाम घ्यायचो, खास त्यांच्यासाठी वेगळे गेम तयार करायचो. अजून बऱ्याच अॅक्टिव्हिटी होत्या जसे की अनुभव कथन, आपल्या आयुष्यातील achievments सांगणे. सर्व जण मनमोकळ करून बोलायची, रमायची. एकंदरीत ग्रुप मस्त चालला होता. पण यात आतापर्यंत माझ्या पाहण्यात आलेली गोष्ट अशी की बरीच जण सर्व अॅक्टिव्हिटी झाल्यावर घरी जायच्या आधी थोडावेळ गप्पा मारण्यासाठी एकत्र बसत. वेगवेगळे विषय निघतच. त्यात एक विषय जास्त असायचा तो म्हणजे सुनांचा विषय. आता सासू लोकांना सूनेविषयी बोलण किती प्रिय असतं सर्वांना ठाऊकच आहे. तर या बोलण्यात चांगल्या गोष्टी कमी आणि गॉसपिंग जास्त असे. म्हणजे माझी सून कशी मला उलटुन बोलते, किंवा घरातलं काम अर्धवट टाकून जाते, सारखी मैत्रिणीसोबत जास्त फिरते एक ना अनेक गोष्टी. ज्या संपतच नसत. जी गत बायकांच्या बोलण्याची तीच पुरुषांची. माझा मुलगा आता माझा राहिला नाही, बायकोचं ऐकतो अश्या गोष्टी. अश्या ह्या गप्पा मी खूप दिवस ऐकत होतो. म्हणून यावर काही उपाय करावा या हेतूने मी एक नवीन अॅक्टिव्हिटी तयार केली. 

रोजच्याप्रमाणे सर्व एकत्र आल्यावर मी ती सांगायचं ठरवलं. त्याप्रमाणे आज तो दिवस आला. सर्व जण वेळेत आली. आम्ही आमचा नेहमीचा व्यायाम केला, थोडा वेळ बसलो व नंतर मी पुन्हा सर्वांना एकत्र केलं. त्यांना गोल करून उभ राहायला सांगितलं आणि बोलायला सुरुवात केली. "मित्रांनो, रोज आपण छान छान गेम खेळत असतो, काहीतरी अॅक्टिव्हिटी घेत असतो. त्यात तुमचा उत्साह, सहभाग पण खूप चांगला असतो आणि हा तुमचा उत्साह, सहभाग पाहूनच मी आज तुमच्यासाठी नवीन अॅक्टिव्हिटी घेऊन आलो आहे." माझं बोलणं ऐकून सर्वांचे चेहरे खुलले. सगळेजण विचारू लागले काय आहे सांग, सुरू करूयात. त्यांना थांबवत मी ॲक्टिविटी चं नाव सांगितलं. "तर या ऍक्टिव्हिटी च नाव आहे चला चांगलं बोलूयात." नाव ऐकून सर्व विचारात पडले. सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. मी पुन्हा सर्वांना शांत केलं आणि समजावून सांगू लागलो. "ॲक्टिविटीच्या नावातून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला चांगला बोलायचं आहे. पण ते कोणाबद्दल ते मी आता सांगतो. तर तुम्ही सगळ्यांनी स्वतःच्या सुनेबद्दल आणि स्वतःच्या मुलाबद्दल प्रत्येकी दोन दोन अशा चांगल्या गोष्टी सांगायच्या आहेत." सर्वांचे चेहेरेच बदलले. मी काहीतरी मोठ कठीण सांगितलं आहे असं त्यांचं तोंड झालं होत. पाहायला गेलं तर प्रश्न काही कठीण नव्हता पण त्याच उत्तर सांगायला पण वेळ घ्यावा लागत होता. पण मला ह्याची सुरुवात करायचीच होती म्हणून मी पटापट सर्वांना विचारू लागलो. अडखळत, आठवत का होईना पण सगळे काही ना काही चांगलं सांगत होते. जसे की, माझी सून डोसा सुरेख करते, माझा मुलगा मला जुनी गाणी आवडतात म्हणून त्याच्या कॅसेट घेऊन येतो, त्यादिवशी सून फिरायला गेली होती तेव्हा मला शाल घेऊन आली. हे सर्व त्यांनी आठवत आठवत चेहेऱ्यावर हसू आणत सांगितलं. सगळ्यांना काही दोन दोन गोष्टी सांगता आल्या अस नाही. पण कोणाकडे काहीच सांगायला नव्हत अस मात्र झालं नाही. 

अशी ही ॲक्टिविटी आम्ही रोज घेऊ लागलो. सुरुवातीला आठवायला लागणाऱ्या गोष्टी आता आपसूक तोंडात येत होत्या. आणि त्या फक्त दोनच राहिल्या नव्हत्या. याला आता आठवडा होत आला. आणि आज जेव्हा आम्ही याला सुरुवात करणार होतो त्याआधी या सर्व जणांनी मला डोळे बंद करायला लावून एक सरप्राइज दिलं. त्या सर्वांनी एक छान असा पुष्पगुच्छ माझ्यासाठी आणला होता. मी तो घेतला व देण्याचं कारण विचारलं, तेव्हा ते म्हणाले "सर तुमच्या या नवीन ऍक्टिव्हिटी मुळे आमची दृष्टी बदलली. इतके दिवस आम्ही फक्त आमच्या मुलांबद्दल तक्रारी करत होतो, त्यांच्या चुका काढत होतो. पण या अॅक्टिविटी मुळे आम्हाला ही जाणीव झाली की त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी पण आहेत ज्यांच्याकडे आमचं दुर्लक्ष होत होत. त्याच्याकडे आमची डोळेझाक होत होती. पण या गोष्टी आम्ही डोळसपणे पाहू लागलो ते तुम्ही घेतलेल्या या अॅक्टिविटीमुळे. सुरुवती सुरुवातीला आम्ही घरी जाऊन पण आठवत बसायचो की काय चांगलं असू शकत? पण नंतर लक्षात आलं की या साऱ्या गोष्टी रोज आमच्या डोळ्यासमोर घडतच असतात. फक्त आपली तशी दृष्टी हवी. ती तुम्ही मिळवून दिली. खरच आपण किती लवकर माणसालानाव ठेवून त्याच्या चुका काढून मोकळे होतो, पण त्यांच्यातले चांगले गुण सांगायला मात्र कष्ट करावे लागतात. पण हे सर्व तुम्ही सोपं करून दिलं. या सगळ्यातून आम्हाला हे समाधान मिळालं, आमच्या मुलांशी, सूनांशी हे नात अजून चांगल झालं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि म्हणून ही छोटीशी भेट." खऱ्या अर्थाने मला माझ्या ग्रुप काढण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं.

आता या गोष्टीला अनेक वर्ष होऊन गेली. मी त्यानंतर अनेक ग्रुप काढले, यासारख्या अनेक अॅक्टिविटी तयार केल्या, सगळ्यांकडून काही ना काही मिळालंच. पण ही अॅक्टिविटी आणि ही भेट माझ्या कायम स्मरणात राहील.


काव्या धनंजय गगनग्रास

एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र





Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...