Skip to main content

No means No

स्वरुपा, स्वरुपा पेठे. तिला पहिल्यापासून खाण्याची खूप आवड. ज्याला आपण फुडी म्हणतो ना तस. तर अशी ही स्वरुपा फुडी होती. जेवणात अमुक एक पदार्थ पाहिजे किंवा अमुक एक गोष्ट मला आवडतच नाही असं तिच नव्हत. तिला सर्व प्रकारचं खाण खायला आवडायचं. नवनवीन पदार्थ  explore करायला तिला आवडायचं. तिचा हा स्वभाव सर्वांना माहीत होता. त्यामुळे पार्टी असुदे किंवा कुठे सहज म्हणून खायला जायचं असेल सर्व जण तिला नक्की  बोलवायचे. आग्रह करून खायला घालायचे.शेवटी खाण बनवणाऱ्याला कोणतरी खवय्या मिळाला तर आनंदच होतो. ती सुद्धा कोणाला कधी नाही म्हणत नव्हती. 

आता सर्व खात होती म्हटल्यावर त्यात तेलकट, तुपकट, जंक फूड या सर्व गोष्टी पण आल्याच. हे असं एकसारखं  खाल्ल्याने स्वरूपाचं वजन जरा वाढलं होत. तिच तिला ते जाणवू लागलं. म्हणून तिने ठरवलं की आपलं बाहेरच खाण असेल किंवा वेळी अवेळी खाण असेल जरा आटोक्यात आणायचं. त्यासाठी प्लॅन करायचा. सोबत व्यायाम ही होताच. आता ही ठरली फूडी मुलगी. त्यामुळे या सर्व गोष्टी कमी करण तिला जरा अवघडच वाटत होत. पण स्वतःच्या आरोग्याचा विचार करता तिला थोडे दिवस तरी हे टाळायला लागणार होत. त्यामुळे तिने कशीबशी मनाची तयारी केली.  

पण त्यात खंड पडला जेव्हा तिला पार्टी साठी बोलावण आलं. कधीही कोणाला नाही न म्हणणारी मुलगी आता तरी कशी म्हणेल. तिथे जाऊन अगदी थोडंसं खाऊन आपण येऊ असा विचार करून ती गेली. पण तो विचारच राहिला. आणि नेहमीप्रमाणे मस्त सर्व छान छान पदार्थांवर ताव मारून आली. असं किमान दोन तीनदा तरी झालं. कारण दर वेळी कोणतरी बोलवत असे किंवा काहीतरी फंक्शन असे. हिचा प्रॉब्लेम हा होत होता की हिला नाही म्हणता येत नव्हत. कारण तस काही  म्हटल तर समोरचा माणूस दुखावण्याची भीती. तरी तिने एकदा तिच्या प्लॅन बद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही त्याला सिरियसली घेतल नाही. पण आता हे दोन तीनदा झाल्यामुळे तिला वाईट वाटू लागलं. आपण वजन कमी करायचं ठरवत आहोत आणि तरी आपल्याकडून ते नीट होत नाही याचं तिला दुःख होत होत. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर लोकांना नाही तरी कस म्हणणार? त्यांचा अपमान केल्यासारखा होईल. काही दिवस मनाची अशी चलबिचल झाल्यावर मात्र तिने ठरवलं की आता काहीही झालं तरी आपल्या निर्णयावर ठाम राहायचं. कोणी कितीही आग्रह केला तरी मोजक जेवढं गरजेचं आहे तेवढं खायचं. 

आता ह ठामपणा आजमवायची वेळही आली. तिच्या एका मैत्रिणीने घरी पार्टी ठेवली होती व तिलाही बोलवलं होत. स्वरूपाने तिच्या प्लॅन मध्ये होत अगदी तेवढं जेवण घेतल व ती जेवली. तेवढ्यात मैत्रीण जवळ येऊन तिला अजून घ्यायला आग्रह करू लागली. पण स्वरूपाने अगदी नम्र भाषेत तिला ती अजून घेणार नाही असं सांगितलं. मैत्रीण दोन तीनदा आग्रह केला व ती दुसऱ्या पाहुण्यांकडे निघून गेली. स्वरूपाने कधी कुणाला नाही म्हटलं नव्हतं. त्यामुळे आज असा ठामपणा दाखवून तिने छोटासा का होईना विजय मिळवला. त्याचा तिला आनंद झाला. तिचा हाच ठामपणा तिने काही दिवस लागू ठेवला आणि गंमत म्हणजे तिला जे वाटत होतं की लोकं आपल्यावर रागावतील, दुखावतील तर त्याची खात्री करायला तिने एक दोघांना विचारलं देखील आणि थोडाफार आपल्या वागण्याचा स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला पण ती लोक तो प्रसंग विसरली होती. कोणाच्याही मनात तिच्याबद्दल रुसवा वगैरे नव्हता. काही जणांनी तिच्या निर्णयच कौतुक देखील केलं. हे सर्व पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की आपण आधीच एखाद्या गोष्टीबद्दल अंदाज लावून मोकळे होतो जे खरे होतीलच असे नाही आणि त्याचबरोबर जर एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर नाही म्हणणं ही योग्य ठरत. फक्त आपण आपल्या निर्णयावर ठाम असावं लागत. जेवढ आपण ठाम राहू लोकही ते मान्य करू लागतात.

स्वरूपाप्रमाणे आपणही अनेक गोष्टी ठरवत असतो. या गोष्टी ठरवताना आपल्याला काही गोष्टींचा त्याग करावा लागतो काही गोष्टींना नाही म्हणावं लागतं अशा वेळी लोकांना दुखावलं जाईल, नाराज  होतील असा विचार करून आपण भीड बाळगतो आणि ठरवलेलं मागे पडत. म्हणूनच आपलं दीर्घकालीन धेय्य लक्षात ठेवायचं आणि त्यासाठी कधी आपल्याला नाही म्हणावं लागत असेल तर ते चुकीचं नाही. त्याचे फायदे आपल्याला नंतर दिसतात.

काव्या धनंजय गगनग्रास

एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र



Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...