Skip to main content

संगत का महत्त्वाची आहे????

तू आधी असा वागत नव्हतास, असा उलट सुलट बोलत नव्हतास, जेव्हापासून त्या वरुणसोबत फिरायला लागलास तुझं वागणं बोलणं पण तसच झालंय. काहीही म्हणा, तुमच्या गायत्रीसोबत राहायला लागल्यापासून आमची सुमन बरीच बदललीय. चार चांगले गुण घेतले तिने तिच्याकडून. असं हे बोलणं आपल्या रोजच्या जीवनात आपण सारखं ऐकत असतो. चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, आपले मित्र मैत्रिणी आपल्या आजूबाजूची लोक चांगली असली पाहिजेत, आपली संगत चांगली पाहिजे असं सारखं म्हटलं जातं. याचं कारण लोकांचा, त्यांच्या सहवासाचा आपल्यावर परिणाम होत असतो, प्रभाव पडतो असतो आणि आपण स्वतः देखील अनुभवलं असेल. ज्यांच्या सानिध्यात आपण खूप काळ असतो, त्यांचे विचार वागणं तरी आपल्यात उतरत आणि पण नकळतपणे त्यांच्यासारखं वागायला सुरुवात करतो. आपली विचार करण्याची पद्धत तशी होऊन जाते, इतकंच काय वाटतं असेल, जाणवत असेल याची देखील आपल्याला जाणीव होते आणि आपण त्यांना कनेक्ट होऊन जातो.

या गोष्टी आपोआप होत नाहीत तर याला शास्त्रीय कारण आहे. सुरुवातीला प्राण्यांवर आणि नंतर माणसांवर केलेल्या निरिक्षणातून, प्रयोगातून हे सिद्ध झालंय की माणूस समोरच्याच्या वागण्यातून शिकत असतो, नकळतपणे तसच वागायचा प्रयत्न करतो, त्या माणसाला समजून घ्यायचा प्रयत्न करतो याचं कारण आहे "mirror neurons'.



आपल्या ह्या सर्व गोष्टी करण्यामागे mirror neurons असतात, जे मेंदुच्या काही विशिष्ट भागांमध्ये आढळतात. 

"Mirror neurons facilitate our learning by enabling us to imitate and understand the actions and behavior of those we observe."

लहान मुलांकडे पाहून हे लगेच लक्षात येत, याच कारण त्यांच्या आजूबाजूला जी माणसं असतात त्यांच अनुकरण करतात ती करतात. म्हणून लहान मुलांसमोर वागताना, बोलताना विचार करून बोलावं असं म्हटलं जातं. नवीन गोष्टी शिकणे, कौशल्य शिकणे, नवनवीन गोष्टी समजून घेणे या सगळ्यामध्ये "mirror neurons" चा वाटा असतो. समोरच्या माणसाच्या डोळ्यात पाणी बघून आपल्याला वाईट वाटणं, त्यांना हसताना पाहून आपल्याला आनंद होणं याचं कारण mirror neurons असतात. दुसऱ्याला मदत करण्यासाठी, त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे जी empathy माणसाकडे लागते ती देखील यातूनच येते. कारण empathetic असणं म्हणजे त्या माणसाला काय वाटतंय, त्याला काय जाणवत आहे याची जाणीव आपण करून घेणे, जेव्हा आपण त्या व्यक्तीला आपण पाहतो तेव्हा मेंदूमधील हे mirror neurons सक्रिय होतात, activate होतात ज्यातून आपण त्यांच्याशी कनेक्ट होतो. या सगळ्या दृष्टीने mirror neurons महत्वाची भूमिका पार पाडतात. यामुळेच आपण दुसऱ्यासारखं वागायला लागतो आणि म्हणून आपण कोणामध्ये वावरतो, उठतो बसतो याला महत्त्व आहे. म्हणून संगत महत्त्वाची आहे. जर आपल्याला चांगल्या माणसाचा सहवास लाभला तर आपल्यालाच त्याचा फायदा होतो, नकळतपणे त्यांच्यासारखं आपलं आचरण होतं यासाठी नेहमी चांगल्या विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहिलं पाहिजे.



Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...