Skip to main content

एकाग्रता वाढवायची आहे???

कोणतही काम नीट व्हायला हवं असेल तर त्यात एकाग्रता खूप महत्त्वाची असते. त्याशिवाय गोष्टी आपल्याला नीट लक्षात येत नाहीत. याचं एकाग्रतेचे महत्त्व पटवून सांगणारी स्वामी विवेकानंदांची ही गोष्ट.



आपल्याला आपल्या आयुष्याकडून नेमक काय हवं आहे, आपल्याला नेमक कोणतं कार्य करायचं आहे याचा शोध घेण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी १८९०च्या जुलैमध्ये पायीच भारतभ्रमण करायचं ठरवलं. असाच प्रवास चालू असताना नोव्हेंबरमध्ये ते मेरठला आले. त्यांच्याबरोबर इतर संन्यासी बंधुही योगायोगाने त्यावेळी तिथे आले. बऱ्याच दिवसानंतर झालेल्या या भेटीमुळे सर्वानाच आनंद झाला आणि ते एकत्र राहू लागले. 

स्वामीजी त्यावेळी मेरठमध्ये अभ्यास करत होते. खूप वाचनही चालू होते. स्वामी अखंडानंदाना ते ग्रंथालयात पाठवत आणि सर जॉन ल्युबक यांच्या समग्र वागमयाचा एकेक ठोकळ्यासारखा खंड घेऊन येण्यास सांगत. दुसऱ्या दिवशी आधीचा खंड परत करायचा आणि नवा घेऊन यायचा. असे बरेच दिवस चालले होते. 

त्या ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल होते त्यांना वाटले की स्वामीजी हे भलेमोठे जाडजूड ग्रंथ वाचतच नसावेत. केवळ लोकांवर छाप पाडण्यासाठी ते रोज एक खंड वाचीत आणि परत करीत असावेत. एके दिवशी स्वामी अखंडानंद खंड बदलून आणायला गेले, तेव्हा त्यांच्याजवळ ग्रंथपालांनी ही शंका बोलून दाखवली. अखंडानंदांनी विवेकानंदांना ती सांगितली. 

नंतर काही दिवसांनी स्वामीजी आपणहून ग्रंथपालाकडे गेले आणि त्यांना म्हणाले, मी हे सगळे खंड अत्यंत लक्षपूर्वक वाचले आहेत. आपल्याला जर याविषयी काही शंका असेल असेल तर पुस्तकातील कोणत्याही भागाविषयी आपण मला प्रश्न विचारावेत. त्यावर ग्रंथपालांनी त्यांना बरेच प्रश्न विचारले. स्वामीजींनी त्या सर्वांची अचूक उत्तरे दिली. ग्रंथपाल चकित झाले. कारण असा माणूस त्यांनी कधीही पाहिला नव्हता.

हे कशामुळे शक्य झालं? तर एकाग्रतेने आणि ही एकाग्रता कधी मिळते? जेव्हा आपल्याला आपलं लक्ष्य माहीत असत तेव्हा. आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे हे माहीत असते तेव्हा आपण तिथेच आपलं लक्ष केंद्रित करतो आणि ते मिळवायचं प्रयत्न करतो. जसं अर्जुनाला जेव्हा पक्ष्याचा डोळा फोडायला सांगितला तेव्हा त्याचं लक्ष केवळ त्या डोळ्याकडेच होतं. आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टीकडे त्याने पाहिलं नाही. तसच आपल्याला काय मिळवायचं आहे हे आपण आधी निश्चित केलं तर आपण त्यावर आपलं मन एकाग्र करू शकतो आणि ती गोष्ट मिळवू शकतो. 




Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...