Skip to main content

काय आहे hypnic jerk????


आपण निवांत झोपायची तयारी करतो आणि झोपतोसुद्धा, पण झोप लागते तेवढ्यातच आपल्याला झोपेतच उंचावरून खाली पडल्याचा भास होतो आणि आपण दचकतो. हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. झोपल्या झोपल्या हे असं का होतं हे आपल्याला अनेकदा लक्षात येत नाही आणि याचं कारण पण समजत नाही. तर सर्वात आधी याला काय म्हणतात हे समजून घेऊ..


तर धड पूर्ण झोपही नाही आणि पूर्ण जागही नाही अश्या मधल्या अवस्थेत झालेल्या या भासाला शास्त्रीय भाषेत hypnic jerk (हायप्निक जर्क) असे म्हटले जाते. असे झटके किंवा हे असे भास तेव्हाच जाणवतात जेव्हा व्यक्ती ना पूर्ण झोपेत असतो ना पूर्ण जागा असतो. साधारण ७० टक्के लोकांना हा अनुभव येतो असे म्हणतात.


आता हे असं होण्यामागचे कारण काय आहे??

तर याला अनेक कारणे आहेत त्यातलं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे झोपेच्या वेळी शरीर पूर्ण विश्रांतीच्या स्थितीत जाते. यावेळी स्नायूंना विश्रांती मिळते आणि हृदयाची गतीही मंदावते. या दरम्यान, हृदय योग्यरित्या काम करत आहे की नाही हे तपासण्याचं काम मेंदू करतो आणि त्यामुळे असे धक्के जाणवतात. याशिवाय, जेव्हा स्नायू विश्रांतीच्या स्थितीत जातात तेव्हा मेंदूला असं वाटतं की आपण खरोखरच पडत आहोत आणि अशा स्थितीत, हायपनिक जर्क सावरण्यासाठी येतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, रात्रीच्या वेळी शरीर झोपते आणि मेंदू पूर्णपणे जागृत असतो आणि कोणत्याही प्रकारची गंभीर परिस्थिती येऊ नये म्हणून शरीराला असा धक्का बसतो.

याशिवाय मानसिक ताण, झोप न लागणे, झोपेच्या वेळेपूर्वी व्यायाम करणे, झोपेच्या आधी कॅफिनचे जास्त सेवन, तणाव आणि चिंता यांचा समावेश होतो ही देखील यामागची कारणे आहेत.


हे  भास किंवा झटके कमी करायचे असतील तर मात्र काही गोष्टी जाणीवपूर्वक करणे आवश्यक आहे.

रोज कमीत कमी ८ तास किमान झोप घ्यावी.

झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करून शरीर रिलॅक्स करावे.

झोपण्यापूर्वी ६ तास आधी व्यायाम करू नये.

योग्य प्रमाणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सेवन करणे.

लोहयुक्त पदार्थांचे सेवन करणे.

झोपण्यापूर्वी कॉफी, सोडा अशी पेये पिणे टाळणे.


हायप्निक जर्क म्हणजे कोणताही आजार किंवा नर्व्हस सिस्टिम डिसॉर्डर नाहीये. रिसर्चनुसार, झोपताना असा झटका जाणवणे अत्यंत सामान्य आहे. पण जर वारंवार तुम्हाला असा अनुभव येत असेल तर मात्र यावर तज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. 


Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...