Skip to main content

किती दिवस दोरखंडात अडकणार??

ही गोष्ट आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली, वाचली असेल. एका गावात एक सर्कस आली होती. ती पाहायला तिथे एक माणूस गेला. तंबू, मोठमोठ्या रींग्ज, हत्ती, घोडे सर्व काही तिथे होतं. हे सर्व पाहताना त्याचं लक्ष एका हत्तीकडे गेलं. मोठा आणि शक्तिशाली असा हत्ती. पण, त्याच्या पाहायला साधा दोरखंड बांधला होता आणि त्यात तो तसाच अडकून होता. एकंदरीत त्या हत्तिकडे पाहून त्याच्या शक्तीपुढे तो दोरखंड काहीही नव्हता, तरीदेखील तो त्यात अडकून पडला होता. 

त्या माणसाला याचं आश्चर्य वाटलं. त्या हत्तीला सांभाळणारा माहूत तिथेच होता. तो माणूस त्याच्याकडे गेला व त्याने गोष्टीमागचे कारण त्याला विचारले, तेव्हा त्याने सांगितले, हे हत्ती वैगरे त्याच्याकडे लहान असल्यापासून त्याच्याकडे आहेत. हत्ती खूप लहान असताना तो त्याच्या पायात दोरखंड बांधत असे. त्यावेळी बांधत असलेला दोरखंड अजूनपर्यंत तसाच चालू आहे. आता हत्तीमध्ये त्याला काढून टाकण्याची ताकत आहेत, पण त्याला त्याची जाणीव नाही.



मानसशास्त्रामध्ये याला ' leanerd helpleness' म्हणजेच 'शिकलेली असहाय्यता ' असे म्हटले जाते. प्राण्यांवर आणि अगदी माणसांवर केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध झालंय की सुरुवातीला काही अनुभवातून जे अपयश येतं त्यातून माणूस इतका असहाय्य होतो की आपण काही करू शकतो, आपल्यात तो क्षमताच तो विसरून जातो आणि एकप्रकारे ही असहाय्यता शिकून घेतो.

याचा परिणाम पुन्हा तशी परिस्थिती आली की मला तसही यात काही करता येणार नाही, मग मी प्रयत्न का करू? माझ्यात ती क्षमताच नाही. मला या गोष्टीत यशच मिळणार नाही ही वृत्ती अंगवळणी पडते. याचे कारण मागचे अनुभव कुठेतरी अजून तसेच मनात ठसलेले असतात.

पण या सगळ्यात आपण हे विसरतो किंवा जेव्हा आपण हे अनुभव घेतले तेव्हाची परिस्थिती, वातावरण, आपल्या क्षमता सर्वच वेगळं होतं. त्यामुळे जरी त्यावेळी आपल्याला अपयश आलेलं असलं त्यावेळी जरी आपण असहाय्य असलो तरी गरजेचं नाही आता असू.

आता त्या परिस्थितीला सामोरं जायची, लहानपणी बांधलेला तो दोरखंड तोडण्याची क्षमता आपल्याकडे असणार आहे. फक्त ती ओळखण्याची गरज आहे. 



Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...