Skip to main content

आरंभ आहे पण अंत नाही...

अरे तू ते काम करायला घेतलं होतस ना मधे, काय झालं त्याचं आता करत नाहीस का? तू नवीन दुकान चालू केलेलस ना, आता चालवत नाहीस का? 

नाही मी केली होती सुरुवात, मला आवडलेले पण ते काम, पण नंतर नंतर नको वाटायला लागलं. काय माहित सुरुवातीला जी मजा येत होती, जो उत्साह होता कामाचा, तो आता नाही वाटत. कामात कशी मजा, एकप्रकारचा उत्साह पाहिजे. त्याशिवाय काय नाही होत. ते नसेल तर काय उपयोग?

सुरुवातीला जोमाने काहीतरी सुरू करून ते अर्ध्यातुन बंद करणं, पुढेच ढकलत राहणं आणि त्यामागची कारण अशी देणं. आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत असं होतं. काहीतरी मोठं ठरवणे, करायला घेणे आणि ते असं पुढे जाणे, बंद पडणे. याला 'Behavioural procrastination' असं म्हणतात. ज्याला आरंभशूरता असे म्हणतात. हा असा चालढकलपणा आहे ज्यात व्यक्तीला वाटत की motivation असलं, प्रेरणा असली तरच ते काम पूर्ण करू शकतो, शेवटपर्यंत नेऊ शकतो. त्याशिवाय काही साध्य करता येत नाही, मिळवता येत नाही. कामात प्रेरणा पाहिजेच. 



खरंच असं असतं का? तर नाही. कोणतंही काम करण्यासाठी प्रेरणा लागते का? तर नक्की लागते. Motivation अशी ऊर्जा आहे, असा driving force आहे जो आपल्याला काहीही करायला प्रवृत्त करतो, पुढे नेतो. त्यामुळे प्रेरणा हवी का? तर ती पाहिजे. पण हे देखील तितकच खरं आहे की प्रेरणेशिवाय देखील काम पुढे चालू ठेवता येतात, ती पूर्ण करता येतात. कधी ? जेव्हा आपल्याला आपलं अंतिम ध्येय काय आहे? आपलं ultimate goal काय आहे हे माहीत असतं. आणि ते पूर्ण करताना दर वेळी आपण प्रेरित असूच असं नाही. दरवेळी आपल्याला उत्साह असतोच असं नाही. उलट जे आपण करतोय त्यातून आपल्याला चांगलं काहीतरी मिळणार आहे, साध्य होणार आहे हे डोक्यात ठेवून आपण ते काम करत राहिलो तर प्रेरणा नसताना सुद्धा आपण ते पूर्ण करू शकतो. अभ्यास करणे, व्यायाम करणे, आरोग्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळणे, पुढे जाऊन स्थैर्य यावं म्हणून आता त्यासाठी कष्ट करणे यात दरवेळी उत्साह किंवा प्रेरणा असत नाही, पण तरीही आपण ते करतो, कारण यातून नंतर आपल्याला काय मिळेल याची जाणीव असते, टप्प्या टप्प्याला त्याची जाणीव आपल्याला होत असते, ते आपण अनुभवत असतो. त्यामुळे सुरुवातीला उत्साह होता नाही असं म्हणून ते काम पुढे ढकलण्यापेक्षा त्यातून आपल्याला काय काय मिळतंय, पुढे जाऊन प्रत्यक्षात काय मिळणार आहे याचा विचार केला पाहिजे. असं केलं तर हा चालढकलपणा नक्की कमी होऊ शकतो.


Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...