Skip to main content

पेपरवरची ती रेघ नक्की जाईल...

मी कितीतरी वर्ष झाली असाच/अशीच आहे, माझी सवयच अशी आहे. मी उशिराच उठतो, मला झोपताना पण चहा प्यायची सवय आहे, मी गेली कित्येक वर्ष तंबाखू खातोय. मधे मी सोडायचा प्रयत्न केला नाही असं नाही, पण नाही होत ना! आता इतक्या वर्षांची लागलेली सवय जाणारे का? 

खरंच आपल्याला लागलेल्या चांगल्या, वाईट सवयी जाऊ शकतात का? आता चांगल्या सवयी घालविण्याचा प्रश्नच येत नाही. पण ज्या वाईट सवयी आहेत त्या घालविण्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा हेच म्हटलं जातं की आता जाणारे का ही सवय? 

तर याच उत्तर आहे, हो! सवयी बदलता येतात आणि घालवतादेखील येतात. आता ते कसं हे समजून घेण्याआधी ह्या सवयी लागतात कश्या हे समजून घेतलं पाहिजे. आता विचार करा, आपण कोऱ्या कागदावर एखादी रेख मारली. तेवढ्यावरच आपण थांबलो नाही तर त्याला गडद करायला आपण त्यावर अजून पेन्सिल फिरवत राहिलो, ती रेख गिरवत राहिलो. याने काय झालं? ती रेख गडद झाली. इतकी की जेव्हा आपण ती खोडायचा प्रयत्न करतो तेव्हा तो सहजासहजी खोडली जात नाही.



आपल्याला लागलेल्या सवयी ह्या या गडद रेघेसारख्या असतात. कधीकाळी फक्त एक साधी रेघ असतात त्याला गिरवून गिरवून म्हणजेच ते काम पुन्हा पुन्हा सातत्याने करून आपण इतकं गडद करून टाकतो की त्या साध्या कृतीचं सवयीत रूपांतर होतं आणि ती सवय इतक्या वर्षांची असल्याने लगेच जात पण नाही.

आता यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे. सवयीची ही जी रेख गडद होते ती अजून कुठे नाही तर मेंदूमध्ये होते. आपल्या मेंदूमध्ये असंख्य न्युरॉन्स कार्यरत असतात. जे आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पाडत असतात. जेव्हा आपण एखाद काम, कृती सातत्याने करू लागतो तेव्हा या न्युरॉन्सचा पट्टा आपल्या मेंदूमध्ये तयार होतो. जसा की एखादा रस्ता घ्या, जितकं आपण चालणार तितका पक्का होणार. इथेही तेच होतं. याला ' न्युरोपाथवे ' असं म्हणतात. 

आपल्या सवयींचे असे न्युरोपाथवे मेंदूमध्ये तयार झालेले असतात जे खूप पक्के असतात. पण यांना कमकुवत करता येतं, कमी करता येतं. याचाच अर्थ आपल्या नको त्या सवयी घालवता येतात. कसं? तर अगदी साधं सोपं आहे. जसं एखादी गोष्ट सतत केल्याने पक्की होते तसच तिला निष्क्रिय करायचं असेल तर याच्या बरोबर उलट करायला लागेल. जर एखादा रस्ता वापरलाच नाही तर तो हळू हळू बंदच पडणार.

तसच या वाईट सवयी घालवायच्या असतील तर यावर उपाय म्हणजे हळू हळू पण सातत्य ठेवून यांना कमी करणे आणि त्याजागी नवीन चांगल्या सवयी लावून घेणे. याने काय होतं आपल्या मेंदूमध्ये नवीन आणि चांगल्या सवयींचा रस्ता तयार होतो, तो पक्का होतो आणि या जुन्या वाईट सवयी कमी होतात, हळू हळू निघून जातात.

आता हे सर्व लगेच होण्यासारखं नसलं तरी अशक्य पण नाही. फक्त जे सातत्य या चुकीच्या सवयी लावून घेण्यात ठेवलं तेच कमी करण्यात ठेवलं की झालं...

Comments

Popular posts from this blog

सतत फोन वाजल्याचा भास होतो...???

कोणाचा फोन आला असेल? थांब हा फोनची रिंग वाजल्यासारखी वाटते पाहतो/ पाहते एक मिनिट. फोन बंद असूनही सारखं कोणाचातरी मेसेज किंवा कॉल आल्यासारखं वाटणं, असा भास होणं आणि त्यामुळे फोन सारखा चेक करत बसणं. सध्या बऱ्याच जणांच्या बाबतीत हे होतंय. तुमच्याही बाबतीत हे असं होत असेल तर दुर्लक्ष करू नका, याचं कारण हा एक आजार आहे. याला 'phantom vibration syndrome' असं म्हणतात. माणसाला उगाचच आपला फोन वाजत असल्याचा भास होतो. वास्तवात तस काही होतंच नसतं. आता याला कारण देखील तशीच आहेत. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे फोनचा अतिवापर.  आताच्या काळात अगदी लहान मूल देखील फोनशिवाय राहत नाही. आपला दिवस फोनचे नोटिफिकेशन पाहून सुरू होतो तो तसेच नोटीफिकेशन पाहून बंद होतो. इतकी आपल्याला फोनची सवय झाली आहे. त्याचबरोबर फोनची ठराविक रिंगटोन, मेसेज टोन ही आपल्या मेंदूमध्ये इतकी फीट बसलेली असते की आपल्याला त्याच आवाजाचा भास होतो. त्याचप्रमाणे सतत ऑनलाईन राहणं, कोणाच्यातरी मेसेजची वाट पाहणं यात आपण मानसिकरीत्या इतके गुंतून जातो की ज्यातून आपल्याला फोन नाही वाजला तरी वाजल्याचा भास होतो. संशोधनातूनदेखील हे सिद्ध झाले आह...

अतिविचारांची साखळी कशी तोडाल??

Overthinking म्हणजेच अतिविचार. आताच्या काळात हा शब्द कोणाला माहीत नाही असं नाही. एखाद्या गोष्टीवर, घटनेवर गरजेहून जास्त विचार करत बसणे. इतका की त्यातून आपला मेंदू क्षीण झाला पाहिजे. आता हे आपण सर्वच जाणतो की कोणतीही गोष्ट विचारपूर्वक केली पाहिजे, काही निर्णय घ्यायचा असेल तर त्याआधी काहीतरी विचार केला पाहिजे, सरळसोट लगेच काही ठरवू नये, वेळ घेतला पाहिजे. पण ज्या गोष्टीचा आपण विचार करतो त्यासाठी किती वेळ घालवावा? त्याची मर्यादा किती असावी? आणि हे करून यातून खरंच आपल्याला हवं ते निष्पन्न होतं का?  दुर्दैवाने अतिविचार म्हणजेच overthinking करणाऱ्या लोकांमध्ये याची जाणीव नसते. त्यांना हे समजतच नाही की इतका विचार करून आपण त्या गोष्टीवर खरंच काहीतरी कृती करण्याची, उत्तर शोधण्याची क्षमताच कमी करून टाकतो. जिथे ज्या गोष्टीवर खरंच काहीतरी action घेणं अपेक्षित असतं तिथे इतका जास्त विचार केला जातो की त्यातून फक्त वेळ आणि आपली शक्ती जाते, त्रास तर होतोच. विचारांच्या या साखळीत जे आपण अडकतो त्याला rumination म्हणजेच रवंथ करणे म्हणतात. एखाद्या गोष्टीचा चोथा होईपर्यंत त्याला चघळत बसायचं. याची सुरुवात ...

बिझी रहा! पण यामध्ये....

आताचा काळच असा आहे की कोणीही पूर्णपणे रिकामं असं नाही. प्रत्येकाचं काही ना काही चालू असतं, कोणत्या ना कोणत्या कामात व्यक्ती व्यस्त आहेच. आता ही व्यस्तता, हे बिझी असणं आपल्यासाठी किती चांगलं आहे, यातून आपल्याला किती फायदा होतो, की आपल्याला या सारख्या व्यस्त राहण्याने त्रास होतो हे आपण नेमकं कोणत्या कामात किती व्यस्त राहतो यावर अवलंबून आहे. कारण हल्ली नुसता फोन चाळत बसण्याला पण बिझी राहणंच म्हणतात. याशिवाय सर्वसामान्यपणे बिझी राहणं याचा संबंध कामाशी जोडला जातो; असं काम जे आपल्या अर्थार्जनाशी जोडलं गेलं आहे, असं जे आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडलेलं आहे. अश्या कामात आपण व्यस्त असतोच. पण यातून आपल्याला आनंद मिळतो का? दर वेळी मिळतो का? अश्या प्रकारच्या अतिरिक्त कामात, यात जास्त वेळ व्यस्त राहिल्याने आपल्याला त्रास होतो. कारण आपल्या बिझी राहण्याच्या निकषामध्ये हेच सर्व येतं. पण याने त्रास होतो म्हणून रिकामं राहायचं का? काही करायचंच नाही का? तर नाही. आपल्याला हे काम केलच पाहिजे,  पण याशिवाय अश्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला बिझी राहायचं आहे, ज्या उपयुक्त असतील, ज्याने आपण व्यस्त पण राहू ...